'IPLच्या पॉवर सेंटर्सची निर्णयामध्ये ढवळाढवळ होऊ नये'

केएल राहुलच विराटचा योग्य उत्तराधिकारी : जगदाळे
Sanjay Jagdale says BCCI should ensure IPL power centers not interfere
Sanjay Jagdale says BCCI should ensure IPL power centers not interfereesakal

इंदूर : विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवा कसोटी कर्णधार (Test Captain) कोण होणार याची चर्चा जोरात सुरु आहे. अनेक जण तर्क वितर्क लढवत आहे. दरम्यान, बीसीसीआयचे (BCCI) माजी सचिव संजय जगदाळे (Sanjay Jagdale) यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की विराट कोहलीनंतर कसोटी संघाचा पुढचा होणारा कर्णधार हा असा असावा जो ही भुमिका बराच काळ निभावू शकले. याचबरोबर जगदाळे यांनी आयपीएलच्या पॉवर सेंटर्सबाबत (IPL Power Centers) बीसीसीआय आणि निवडसमितीला एक इशाराही दिला. (Sanjay Jagdale says BCCI should ensure IPL power centers not interfere)

Sanjay Jagdale says BCCI should ensure IPL power centers not interfere
श्रेयस अय्यर विराट कोहलीची जागा घेणार?

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कसोटी कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले. त्याने २०१४ मध्ये महेंद्रसिंह धोनीकडून (MS Dhoni) कसोटी नेतृत्वाची धुरा आपल्या हातात घेतली होती. आता बीसीसीआयला कसोटीसाठी नवे नेतृत्व शोधावे लागणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले 'मला वाटते की भारताचा पुढचा कर्णधार हा ही जबाबदारी दीर्घ काळ सांभाळू शकले असा असावा. त्यामुळे माझ्या मते मी केएल राहुलचे (KL Rahul) पुढचा कसोटी कर्णधार म्हणून नाव सुचवतो.'

Sanjay Jagdale says BCCI should ensure IPL power centers not interfere
Australian Open: राफेल नदालने एक पाऊल टाकले पुढे

जगदाळे यांना वाटते की राहुलने तीनही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. याचबरोबर जगदाळे यांनी बीसीसीआय आणि निवडसमितीने भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket) रणनीती ठरवण्याच्या निर्णयात आयपीएलचे पॉवर सेंटर्स ढवळाढवळ करणार नाहीत याची काळजी घेण्यावरही भर दिला.

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये तणावाचे वातावरण होते. बीसीसीआयने त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवले होते. मात्र जगदाळे या बाबत म्हणाले की, विराट कोहलीने आपल्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.कोणीही कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीचे योगदान नाकारु शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com