विराट कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेक दिग्गज खेळाडूंनी, आजी माजी खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीने कर्णधार (Captain Virat Kohli) पदाचा राजीनामा दिल्यानंतर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) देखील यावर प्रतिक्रिया दिली. गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन कार्यक्रमात म्हणाला की कर्णधारपद हे कोणासाठी जन्मसिद्ध अधिकार नसतो. (Gautam Gambhir Captaincy Not Anyone Birthright)
स्टार स्पोर्ट्सच्या या कार्यक्रमात गौतम गंभीरला आता कर्णधारपदाचा मुकूट डोक्यावरून उतरल्यानंतर आपल्याला वेगळा विराट कोहली बघायला मिळेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने 'तुम्ही त्याच्यात नवीन असं काय पाहू इच्छिता? कर्णधारपद हे कोणसाठीही जन्मसिद्ध अधिकारासारखे (Birthright) नसते. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सारख्या व्यक्तीने आपले कर्णधारपद सोडले. त्याने ते विराट कोहलीकडे सपवले. तो त्याच्या नेतृत्वाखाली खेळला होता. धोनीने तीन आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकल्या आहेत. ४ आयपीएल (IPL) टायटल त्याच्या नावावर आहेत.'
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, विराट कोहलीचे संपूर्ण लक्ष आता धावा करण्याकडे आणि संघासाठी सामना जिंकून देण्याकडे असायला हवे. गंभीरने सांगितले की, 'विराटने आता धावा करण्याकडे (Virat Kohli Runs) लक्ष केंद्रीत करावे. ज्यावेळी तुम्ही भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहता त्यावेळी तुम्ही कर्णधार होण्याचे स्वप्न पाहत नसता. तुम्ही भारतासाठी सामना जिंकण्याचे स्वप्न पाहत असता. तेथे तुम्ही नाणेफेक करायला आणि क्षेत्ररक्षण करायला जात नाही. तुम्ही ज्यावेळी देशाकडून खेळता त्यावेळी तुमचा उत्साह तेवढाच असतो तो कमी होत नाही.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.