शेवटचे षटक उमरान मलिकलाच का दिले, हार्दिक पांड्या म्हणाला...

Hardik Pandya Reveal Why Umran Malik Given Very Important Last Over Against Ireland
Hardik Pandya Reveal Why Umran Malik Given Very Important Last Over Against Irelandesakal

डब्लिंग : भारताने आयर्लंडविरूद्धचा दुसरा टी 20 सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2 - 0 ने खिशात टाकली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात 225 धावा करून देखील आयर्लंडच्या फलंदाजांनी चांगलेच टेन्शन दिले होते. मात्र अखेरचे षटक टाकणाऱ्या उमरान मलिकने शेवटचे तीन चेंडू चांगला टाकत सामना जिंकून दिला. शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी 17 धावांची गरज होती. मात्र उमरान मलिकने 12 धावा देत सामना भारताच्या बाजूने झुकवला. (Hardik Pandya Reveal Why Umran Malik Given Very Important Last Over Against Ireland)

Hardik Pandya Reveal Why Umran Malik Given Very Important Last Over Against Ireland
उदयपूर हत्याकांडावर इरफानला बोलणं पडलं महागात; नेटकऱ्यांचा संताप

दरम्यान, सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याला सामन्याचे महत्वाचे शेवटचे षटक नवख्या उमरान मलिकला का दिले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी हार्दिक म्हणाला की, 'मला कोणताही गोष्टीचा दबाव घ्यायचा नव्हता. मला सध्याच्या घडीचा विचार करायचा होता आणि मला उमरान मलिकला पाठिंबा द्यायचा होता. त्याच्याकडे वेग आहे. या वेगासमोर षटकात 18 धावा करणे सोपे नसते. त्यांनी काही आकर्षक फटकेबाजी केली. त्यांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. याचे श्रेय त्यांना द्यावेच लागले. तसेच आपल्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी प्रभावी मारा केला त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे.'

Hardik Pandya Reveal Why Umran Malik Given Very Important Last Over Against Ireland
Ind vs Ire: दमदार अर्धशतक संजू सॅमसनसाठी वर्ल्डकपचे दार उघडेल?

हार्दिक पांड्याने आयर्लंडमध्ये भारतीय संघाला मिळालेल्या मोठ्या पाठिंब्याबाबत देखील आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला 'प्रेक्षकांची संख्या मोठी होती. त्यांचे दिनेश कार्तिक आणि संजू सॅमसन हे फेव्हरेट होते. पृथ्वीच्या या टोकावर आलेला हा अनुभव खूप मस्त होता. आम्हाला पाठिंबा द्यायला खूप लोकं मैदानावर आली होती. आम्ही त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचे खूप खूप आभार.'

पांड्या पुढे म्हणाला, 'तुम्ही लहान असताना तुमचे एकच ध्येय असते देशाकडून खेळणे. भारताचे नेतृत्व करणे आणि पहिला सामना जिंकणे हे खूप खास असतं, आता मालिका देखील जिंकणे खासच आहे. उमरान आणि दीपकच्या कामगिरीवर खूष आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com