Ind vs NZ: नो बॉल 'किंग' अर्शदीप सिंग! शेवटच्या षटकात दिल्या 27 धावा; रैनाला ही टाकले मागे

No-ball सोडत नाहीये अर्शदीप सिंगची पाठ; कर्णधार हार्दिकही नाराज
IND vs NZ Arshdeep Singh
IND vs NZ Arshdeep Singhsakal

Arshdeep Singh Ind vs NZ : फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीचा भारतीयांपेक्षा न्यूझीलंडनेच अधिक फायदा घेतला आणि पहिला ट्वेंन्टी-20 सामना 21 धावांनी जिंकला. पॉवरप्लेमध्ये सूर्यकुमारला सँटनरने एक षटक निर्धाव टाकले, यावरून न्यूझीलंड फिरकीचे वर्चस्व अधोरेखित झाले.

वॉशिंग्टन सुंदरचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांचे अपयश, त्यात अर्शदीपने अखेरच्या षटकात दिलेल्या तब्बल 27 धावा दिल्या. अर्शदीपच्या या महागड्या षटकाने न्यूझीलंडला 176 धावांपर्यंत मजल मारली. नंतर भारतीय संघाला 9 विकेट्सवर केवळ 155 धावा करता आल्या आणि सामना 21 धावांनी गमवावा लागला.

IND vs NZ Arshdeep Singh
IND vs NZ: न्यूझीलंडला खरी झुंज तर एकट्या सुंदरनेच दिली; पांड्या हे काय बोलून गेला

अर्शदीप सिंगचे अखेरचा षटक भारताला फारच महाग पडले. न्यूझीलंडच्या डावाच्या 20व्या षटकात अर्शदीप सिंगने पहिला चेंडू नो-बॉल टाकला. नो-बॉल टाकल्यानंतर अर्शदीपवर दबाव स्पष्ट दिसत होता आणि मग फ्री-हिट चेंडूवर मिशेलने षटकारही ठोकला. पुढच्या दोन चेंडूत त्याने एकूण दहा धावा दिल्या. नंतर अर्शदीप सिंगने थोडेसे पुनरागमन करत डॅरिल मिशेलला शेवटच्या तीन चेंडूत केवळ सहा धावा करू दिल्या. या षटकात एकूण 27 धावा फटकावण्यात आल्या.

IND vs NZ Arshdeep Singh
Ranji Trophy: नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्या डावातील ‘टाय’ दोघांच्याही मुळावर

अर्शदीप सिंगच्या खराब गोलंदाजीमुळे कर्णधार हार्दिक पांड्याही खूप नाराज दिसत होता. अर्शदीप सिंगने नो-बॉल टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच महिन्यात अर्शदीप सिंगने पुण्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात दोन षटकात एकूण पाच नो-बॉल टाकले. त्या सामन्यानंतर हार्दिकने नो-बॉल फेकणे हा गुन्हा असल्याचे म्हटले होते.

अर्शदीप सिंगने सरावात आपल्या गोलंदाजीवर विशेष लक्ष दिले पाहिजे कारण मोठ्या सामन्यांमध्ये नो-बॉल टाकल्याने भारताचा त्रास वाढू शकतो. गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनाही अर्शदीपच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

IND vs NZ Arshdeep Singh
Hardik Pandya : कोणाच्याही ध्यानी मनी नव्हतं की... कर्णधार पांड्याला पराभवानंतर बसला धक्का

अर्शदीप सिंगने 20 व्या षटकात 27 धावा देऊन काही खास विक्रम केले आहेत. अर्शदीप आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डावाच्या 20व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. या त्याने सुरेश रैनाचा विक्रम उद्ध्वस्त केला. 2012 मध्ये रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 26 धावा लुटल्या होत्या. यासोबतच अर्शदीप सिंग हा पहिला भारतीय गोलंदाज आहे ज्याने टी-20 क्रिकेटमध्ये दोन वेळा एका ओव्हरमध्ये 25 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत.

डावाच्या 20व्या षटकात सर्वाधिक धावा (भारतीय गोलंदाज)

  • 27- अर्शदीप सिंग2023

  • 26- सुरेश रैना 2012

  • 24- दीपक चहर 2022

  • 23- खलील अहमद 2018

  • 23- हर्षल पटेल 2022

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com