बायो बबलमुळे टीम बॉडिंग वाढलं; आता जुळवून घ्यायला वेळ लागेल : ऋतुराज

India Star Opener Ruturaj Gaikwad Statement About Bio Bubble Free Environment
India Star Opener Ruturaj Gaikwad Statement About Bio Bubble Free Environmentesakal

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. तिसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. त्याने धडाकेबाज सुरूवात करत 57 धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला बायो बबलमध्ये असताना आणि बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतरचा अनुभव कसा होता असा प्रश्न विचारण्यात आला. (Ruturaj Gaikwad Statement About Bio Bubble Free Environment)

त्यावेळी ऋतुराज गायकवाडने 'आम्ही बायो बबलमध्ये बराच काळ राहिलो. मात्र मला जाणवलेली बायो बबलमधील चांगली गोष्ट म्हणजे यामुळे संघातील बॉडिंग वाढले. मी ज्या कोणत्या संघाकडून खेळलो मग ते आयपीएल असो किंवा टीम इंडिया तेथे सांघिक भावना वाढवण्यासाठी भरपूर उपक्रम राबवण्यात आले. याचा चांगलाच फायदा झाला. येणाऱ्या पुढच्या वर्षात देखील याचा फायदा होईल.'

India Star Opener Ruturaj Gaikwad Statement About Bio Bubble Free Environment
के एल राहुलच्या दुखापतीत वाढ? इंग्लंडविरुद्ध कसोटी- टी20 ला मुकणार

ऋतुराज पुढे म्हणाला की, 'बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर तुमच्या अवती भोवती खूप लोक जमा होतात. ही बायो बबलमधून बाहेर आल्यानंतरची पहिलीची मालिका आहे. त्यामुळे सर्वांनाच या परिस्थितीशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल.'

'कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही एका बंदिस्त वातावरणात होतो. लोक तुमच्याकडे येत नव्हते. त्यामुळे बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर अनेक चाहते जवळ येत आहेत. अनेक गोष्टींची मागणी करतात. सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला खूप अटेंशन मिळत आहे. यामुळे मन विचलित देखील होते. त्यामुळे बायो बबलचे काही फायदे आणि तोटेही आहेत. माझ्या मते हे दोन्ही अनुभव तुम्ही घेतले पाहिजे.'

India Star Opener Ruturaj Gaikwad Statement About Bio Bubble Free Environment
VIDEO : चहल चमकला! बायको सोडा सासूबाईंनीही लगावले ठुमके

ऋतुराज गायकवाड गंमतीने म्हणाला की, 'बायो बबल मधून बाहेर आल्यानंतर सर्वात मोठा बदल हा पत्रकार परिषदेत झाला आहे. डिजीटल पत्रकार परिषदेत तुम्हाला काही ऐकू येत नाही किंवा नेटवर्कची समस्या असू शकते. तुम्ही त्यावेळी प्रश्न टाळू शकत होता. आता मात्र तुम्हाला प्रश्न टाळता येणार नाहीत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com