

IND vs ENG
esakal
नॉटिंगहॅम: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाला मागील चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय संघ उद्या (ता. ७) यजमान इंग्लंडचा सामना करणार आहे. रवि बिश्नोईच्या एका षटकात २९ धावांची लूट केल्यामुळे दुसऱ्या टी-२० लढतीत पराभवाची नामुष्की ओढवली. आता नॉटिंगहॅम येथील लढतीत एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रवि बिश्नोईला वगळून प्रिन्स यादवला टीम इंडियामध्ये संधी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.