India vs England 5th T20
esakal
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना सध्या सुरू आहे. मात्र, या सामन्यातही भारतीय संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण निराशाजनक ठरले आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. इंग्लडने २० षटकांत १ बाद २५७ धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध इंग्लंडची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.