

Hardik Pandya
esakal
कोलकता : कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल लढतीत मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका बसला असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. यंदाच्या आयपीएल मोसमात आमच्याकडून क्षेत्ररक्षणात चुका झाल्या. अनेक झेल सोडण्यात आले. ही बाब लपवण्यासारखी नाही. झेल सोडल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळू शकते. झेल सोडल्यानंतर संघ बॅकफूटवर फेकला जातो. या मोसमात आमच्याकडून क्षेत्ररक्षणात वारंवार चुका करण्यात येत होत्या. याचा विपरीत परिणामही मैदानात दिसून आला.