
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी (६ मे) मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार ३ विकेट्सने विजय मिळवला. पावसामुळे या सामन्यात अडथळा आला होता. पण शेवटच्या चेंडूवर गुजरातने विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १५५ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर मुंबईत जोराचा वारा सुरू झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांनी परिस्थितीचा फायदा घेत गुजरातला पॉवरप्लेमध्ये मोठे शॉट्स खेळू दिले नव्हते.
गुजरातने दुसऱ्या षटकात साई सुदर्शनची विकेटही ५ धावांवर गमावली होती. जोरदार वाऱ्यामुळे गिलने अंपायर्सकडे सामना थांबवण्यासाठीही विचारणा केली. पण अंपायर्सने खेळ पुढे चालू ठेवला. ५ षटकांनंतर डकवर्थ लुईस नियम लागू होतो, त्यामुळे सामना रद्द होण्याची नामुष्की टळते.