

आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू आहे, या हंगामात जवळपास सगळ्या संघाचे दोन दोन सामने झाले आहेत. ज्यात सगळ्या संघाने एका एका सामन्यात तरी विजय मिळवला आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्सने तर सुरुवातीचे ३ सामने गमावले असून गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानावर आहेत. यावर भारताचा माजी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर तो चेन्नईकडून आणखी का खेळू शकला नाही, आणि त्याने निवृत्तीचा निर्णय का घेतला यावर रविचंद्रन अश्विन व्यक्त झाला आहे.