Mumbai Indians ला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या आतापर्यंतच्या तीन सामन्यांत फक्त एक विजय मिळवता आला आहे. विग्नेश पुथूर व अश्वनी कुमार हे दोन युवा स्टार मुंबईने शोधून आणलेत, परंतु जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) वेगाची, अचुकता त्यांच्यात नाही. त्यामुळेच मुंबईचे चाहते जसप्रीतच्या पुनरागमनाकडे डोळे लावून आहेत आणि तो लवकरात लवकर परतावा, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, त्यांना प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. जसप्रीत RCB विरुद्ध सोमवारी होणाऱ्या लढतीतून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पण, त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले आहेत.