
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचे पुनरागमन यंदा चर्चेचा विषय राहिला. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला गेल्यावर्षी पहिल्यांदाच हार्दिकच्या नेतृत्वात खेळताना शेवटच्या क्रमांकावर रहावं लागलं होतं. त्यानंतर यावर्षीही त्यांची कामगिरी सुरुवातीला चांगली झाली नव्हती.
पहिल्या ५ सामन्यांमध्ये केवळ एकच सामना मुंबईला जिंकता आला होता. पण त्यानंतर मुंबईने पुनरागमन केलं. मुंबईने नंतर सलग ६ सामने जिंकले. त्यामुळे मुंबई १२ सामन्यांमध्ये ७ विजयासह १४ गुण मिळवून सध्या चौथ्या क्रमांकावर असून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दावेदार आहेत.