

Virat Kohli
esakal
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली अजूनही खेळावर तितक्याच मनापासून प्रेम करतो. त्यामुळेच २०२७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, आपल्या क्षमतेवर आणि योगदानावर सतत प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर ती जागा माझ्यासाठी नाही, हे स्वीकारतो आणि बाजूला होतो, असे रोखठोक विधान विराटने केले.