पंत पुजारावर रागवला होता; रहाणेने सांगितला 'तो' किस्सा

Rishabh Pant Angry On Cheteshwar Pujara During 2020-21 Australia tour Says Ajinkya Rahane
Rishabh Pant Angry On Cheteshwar Pujara During 2020-21 Australia tour Says Ajinkya Rahane esakal

नवी दिल्ली : ऋषभ पंत जरी सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत फारशी चमक दाखवत नसला तरी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये काही स्मरणीय खेळी केल्या आहे. 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमध्ये सिडनी कसोटीत 97 धावांची दमदार खेळी केली होती. या खेळीच्या जोरावरच भारताने ड्रॉ होणाऱ्या सामन्यात जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. यानंतर आर. अश्विन आणि हनुमा विहारीने भागीदारी रचत सामना अनिर्णित ठेवला. (Rishabh Pant Angry On Cheteshwar Pujara During 2020-21 Australia tour Says Ajinkya Rahane)

Rishabh Pant Angry On Cheteshwar Pujara During 2020-21 Australia tour Says Ajinkya Rahane
इंग्लंडचा विश्वविक्रम! एकदिवसीय सामन्यात ठोकल्या 498 धावा

या सामन्यात पंत आणि पुजाराने चौथ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली होती. मात्र ऋषभ पंत शतकाला अवघ्या 3 धावांची गरज असताना बाद झाला. आता या बाद होण्यामागचे कारण समोर आले आहे. ऋषभ पंतची एकाग्रता भंग झाल्यामुळे तो बाद झाला आणि त्यासाठी तो त्याचा पार्टनर चेतेश्वर पुजाराला दोष देतो.

वूटवरील बंदो में था दम या सिरीजमध्ये बोलताना ऋषभ पंत म्हणाला, 'पुजारा म्हणाला की ऋषभ काही वेळी बघून खेळ. आपण एकेरी किंवा दुहेरी धावा करून तुला चौकार मारायची गरज नाही. मी त्यावेळी थोडा रागवला होतो. त्यांनी मला द्विधा मनस्थितीत टाकले होते. मला काय करायचे होते हे मला माहिती होते. आम्ही चांगल्या लयीत फलंदाजी करत होतो. त्यावेळी अचानक हे काय झालं? जर मी शतकापर्यंत पोहचलो असतो तर ते माझे सर्वोत्तम शतकांपैकी एक शतक असते.'

Rishabh Pant Angry On Cheteshwar Pujara During 2020-21 Australia tour Says Ajinkya Rahane
IPL ची दणक्यात कमाई; आता ICC नेही मीडिया राईट्सची 'पॉलिसी' बदलली

त्यावेळचा कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे देखील म्हणाला की, ड्रेसिंग रूममध्ये परतताना ऋषभ पंत खूष नव्हता. त्याला असे वाटले की मी जे काही करत होतो ते करू द्यायला हवे होते. त्याचे शतक झालेच असते. अजिंक्य म्हणाला, 'पुजारा दुसऱ्या बाजूने त्याला सावध खेळण्याचा सल्ला देत होता. आपण धावा नंतर करू शकतो. अनुभवी खेळाडू तुमच्याजवळ येऊन सांगतो की तू सावध खेळ तू 97 धावांवर आहेस. तू सावध खेळलास तर शतक पूर्ण करू शकतो. पंत त्याच्या शैलीनुसार खेळत होता. मात्र दुर्दैवाने तो बाद झाला.'

रहाणे पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी तो ड्रेसिंग रूममध्ये आला त्यावेळी तो थोडा रागात होता. तो म्हणाला की, पुजारा भाईने मला आठवण करून दिली की मी 97 धावांवर आहे. मला माहिती नव्हते. जर त्याने मला काही सांगितले नसते तर मी माझे शतक पूर्ण केले असते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com