
आता पुन्हा नको रे बाबा! म्हणत ऋषभ पंतने सोडला सुटकेचा निश्वास
नवी दिल्ली : भारताचा स्टार विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंतने बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे सुटकेचा निश्वास सोडला. बीसीसीआयने नुकतेच टीम इंडियाला बायो बबलमधून बाहेर काढले आहे. आगामी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत टीम इंडियावर बायो बबलची बंधणे असणार नाहीत. (Rishabh Pant feeling relaxed After BCCI Removed Bio Bubble)
देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या घटलेली पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संघातील विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंतने सुटकेचा निश्वास सोडला. पंत सध्या टीम इंडियाबरोबर दिल्लीत आहे. येत्या 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतला पहिला सामना अरूण जेटली मैदानावर होत आहे.
हेही वाचा: 'सर्वात कमी महत्व दिला गेलेला खेळाडू' म्हणत सेहवागच्या रहाणेला शुभेच्छा
याबाबत पंत म्हणाला की, 'बायो बबलमधून बाहेर आल्यावर खूप समाधान वाटतयं. आता बायो बबल हा प्रकार पुन्हा नको. मला आशा आहे की पुन्हा बायो बबलमध्ये जावे लागणार नाही. मी मुक्त झाल्याचा आनंद घेत आहे. आम्ही खूप कठिण काळातून गेलो आहे.'
ऋषभ पुढे म्हणाला की, 'तुम्ही वर्षभर मोठ्या दबावात खेळत असता. अशावेळी तुम्हाला थोडा निवांतपणा गरजेचा असतो. जर तुम्ही तमचे मन ताजेतवाणे करू शकत नसाल तर तुम्ही तुमचे 100 टक्के योगदान देऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे मन ताजेतवाणे करणे गरजेचे असते.'
हेही वाचा: Khelo India : 18 वर्षाच्या हर्षदाने 152 किलो वजन उचलत केला राष्ट्रीय विक्रम
पंतला त्याच्या बलस्थानाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, 'मी मैदानावर माझे 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. मी एक विकेटकिपर बॅट्समन आहे. मी लहाणपणापासूनच विकेटकिपिंग करत आलो आहे. माझे वडील देखील विकेटकिपरच होते. विकेटकिपिंग करण्याची प्रेरणा तेथूनच मिळाली.'
Web Title: Rishabh Pant Feeling Relaxed After Bcci Removed Bio Bubble
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..