IND vs NZ: 'माझं चुकलं...' टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सूर्या असं का म्हणाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suryakumar yadav

IND vs NZ: 'माझं चुकलं...' टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सूर्या असं का म्हणाला?

IND vs NZ Suryakumar Yadav : लखनौमध्ये खेळला गेलेला भारत-न्यूझीलंड सामना क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. अवघ्या 100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला अखेरच्या षटकात विजय मिळाला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 06 विकेट्सने सामना जिंकला. त्याचबरोबर या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

अशा स्थितीत आता मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. भारताच्या या विजयात उपकर्णधार सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताबही मिळाला आहे. त्याचबरोबर त्याने या सामन्यानंतर मोठी प्रतिक्रियाही दिली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात सामनावीर ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवने मोठे वक्तव्य केले आहे. सूर्यकुमार यादव म्हणाले की, आज माझे वेगळे रूप दिसले. जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा खेळणे आणि परिस्थितीनुसार जुळवून घेणे खूप महत्त्वाचे होते. खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. वॉशिंग्टन बाद झाल्यानंतर फलंदाजाने खेळपट्टीवर टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे होते.

पुढे बोलताना सूर्या म्हणाला, वॉशिंग्टन ज्या पद्धतीने धावबाद झाला ती माझी चूक होती. शेवटच्या षटकात आम्हाला माहित होते की आम्हाला जिंकण्यासाठी फक्त एका चांगल्या शॉटची गरज आहे. हार्दिक माझ्याकडे आला आणि म्हणाला की पुढच्या चेंडूवर तू विजयी धाव घेणार आहेस आणि त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला.

भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेगळा सूर्य पाहायला मिळाला. अवघड खेळपट्टीवर सूर्याने अतिशय हुशारीने फलंदाजी केली.

भारताला सूर्यकुमारच्या या खेळीची गरज होती आणि सूर्याने परिस्थितीनुसार फलंदाजी केली. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. आणि आपल्या संघाला सामना जिंकून देऊनच तो परतीच्या पॅव्हेलियनमध्ये परतला. 100 पेक्षा कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने टीम इंडियाला सामना जिंकून दिला. सूर्यकुमार यादवने 31 चेंडूंचा सामना केला आणि 83.87 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना नाबाद 26 धावा केल्या.

ज्यामध्ये फक्त 1 चौघांचा समावेश होता. सूर्यकुमारच्या बॅटमधून अशी खेळी पाहून सगळेच थक्क झाले. कारण तो त्याच्या डॅशिंग स्टाइलसाठी ओळखला जातो. मात्र, त्याच्या संथ खेळीसाठी त्याला आता सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.