T20 World Cup : रोहितला टी-20 वर्ल्डकप मध्ये अंतिम षटकांतील गोलंदाजीची चिंता

आशिया करंडक स्पर्धेपासून `डेथ ओव्हर` मधील गोलंदाजी भारतीय संघाच्या मुळावर आली आहे.
T20 World Cup
T20 World Cup

T20 World Cup : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली असली तरी डेथ ओव्हर (अंतिम षटकांतील) गोलंदाजी आमच्यासाठी अजूनही चिंता करणारी आहे, ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत गोलंदाज या कमकुवत बाजूवर मार्ग काढतील, असा विश्वास कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.

आशिया करंडक स्पर्धेपासून `डेथ ओव्हर` मधील गोलंदाजी भारतीय संघाच्या मुळावर आली आहे. गतविजेते असतानाही आशिया करंडक स्पर्धेतून लवकरच रोहित शर्माच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २०८ धावांचेही संरक्षण करता आले नव्हते. त्या सामन्यात अखेरच्या तीन षटकांत ५३ धावा देण्यात आल्या होत्या.

त्या पराभवानंतर भारताने पुढचे दोन सामने जिंकून मालिका जिंकली खरी; परंतु डेथ ओव्हरचा प्रश्न कायमच राहिला. काही बाबतीत प्रामुख्याने डेथ ओव्हरमध्ये आम्हाला मोठी सुधारणा करावी लागणार आहे, असे रोहित मालिका विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

T20 World Cup
Taniya Bhatia : इंग्लंडमध्ये होतयं काय? दिप्तीचा वाद निवळतोय तोच तानियाच्या रूममध्ये...

मात्र भुवी, हर्षलची पाठराखण

अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि आयपीएल गाजवणारा हर्षल पटेल यांची डेथ ओव्हरमधील गोलंदाजी भलतीच महागडी ठरली. या अखेरच्या षटकांत देण्यात येत असलेल्या धावा घात करणाऱ्या ठरत असल्याचे रोहित शर्मा म्हणत असला तरी भुवनेश्वर आणि हर्षल यांची मात्र तो पाठराखण करत आहे. हे दोघेही बऱ्याच काळानंतर संघात आले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची मधली फळी आणि त्यानंतरचे फलंदाज ताकदीचा खेळ करतात, या बाबीही लक्षात घ्यायला हव्यात. लवकरच ते यात सुधारणा करतील, असे रोहित म्हणाला. हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमरा दुखापतीनंतर संघात परतले असले तरी भुवनेश्वर मात्र आशिया करंडक स्पर्धेतही खेळला आहे. डेथ ओव्हरबाबत चिंता व्यक्त करत असताना रोहितने एकूणच मालिका विजेतेपदावर समाधान व्यक्त केले. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फलंदाजाने मॅचविनिंग कामगिरी केली.

T20 World Cup
IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का, हा अष्टपैलू खेळाडू दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर

प्रयत्न करत राहावेच लागते

रोहित पुढे म्हणतो, ट्वेन्टी-२० प्रकारात कधी-कधी अनेक गोष्टी करण्याच्या प्रयत्नात चुका होत राहतात. या प्रकारात मुळातच एक चूक मुळावर येऊ शकते, तरीही धोका स्वीकारावा लागतो. प्रत्येक वेळी यश येईलच असे नाही; परंतु प्रयत्न करत राहिले तरच सुधारणा करण्याचा मार्ग मिळत जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com