WI vs IND : रोहित-विराटला पुन्हा का डावललं? मालिका जिंकल्यानंतर पांड्याचा मोठा खुलासा

WI vs IND series Hardik Pandya
WI vs IND series Hardik Pandyasakal
Updated on

WI vs IND series Hardik Pandya : भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली आहे. टीम इंडियाने पहिला वनडे 5 विकेटने जिंकला होता, मात्र त्यानंतर वेस्ट इंडिजने दुसरी वनडे 6 विकेट्सने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसरी वनडे 200 धावांनी जिंकून मालिका 2-1 ने जिंकली. सामना जिंकल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्याचे कारण सांगितले आहे.

WI vs IND series Hardik Pandya
Wi vs Ind: 'काही मूलभूत गरजांची...' विंडीज क्रिकेट बोर्डाच्या निष्काळजीपणावर कर्णधार पांड्या संतापला

सामना जिंकल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, हा विजय खास आहे. एक कर्णधार म्हणून मी अशा सामन्याची वाट पाहतो. आम्हाला माहित होते की काय धोक्यात आहे आणि आम्ही हरलो तर खूप काही होईल. मुले चांगली खेळली आणि त्यांनी खेळाचा आनंद लुटला. दबावाच्या परिस्थितीत मजा करणे महत्वाचे आहे.

WI vs IND series Hardik Pandya
Ashes ball-change controversy : पराभवाचे खापर बदललेल्या चेंडूवर! कांगारूचे आजी-माजी खेळाडू लागले रडायला

कर्णधार हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे संघाचे महत्त्वाचे भाग आहेत, परंतु ऋतुराज गायकवाडसारख्या खेळाडूला संधी मिळावी यासाठी त्यांना विश्रांती देणे आवश्यक होते. तरुणांना संधी द्यायची होती. फलंदाजी करताना मला थोडा वेळ मैदानावर घालवायचा होता. सामन्यापूर्वी विराटशी चांगली गप्पा मारल्या, मी यादरम्यान थोडा वेळ घालवावा आणि 50 षटकांच्या फॉर्मेटची सवय लावावी अशी त्याची इच्छा होती. त्याचा अनुभव माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

WI vs IND series Hardik Pandya
Australian Open : ट्रीसा-गायत्री दुसऱ्या फेरीत; कॅनडाच्या जोडीवर मात

वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 351 धावांची मोठी धावसंख्या उभारली, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 151 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 85 धावा केल्या. इशान किशनने 77 धावा केल्या आणि कर्णधार हार्दिक पांड्याने अखेरपर्यंत आक्रमक फलंदाजी करत 70 धावांची खेळी केली. शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com