Women's Asia Cup T20 : भारताचा 181 धावा करूनही मलेशियाविरूद्ध 30 धावांनी विजय

Women's Asia Cup 2022 India Women's Cricket Team Defeat Malaysia Women Team DLS method
Women's Asia Cup 2022 India Women's Cricket Team Defeat Malaysia Women Team DLS methodesakal

India Women vs Malaysia Women : आशिया कप महिला क्रिकेट 2022 मध्ये आजच्या सामन्यात भारताने मलेशियाचा 30 धावांनी पराभव केला. भारताने मलेशियासमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मलेशियाने 5.2 षटकात 2 बाद 16 धावा केल्या असतानाच पावसाने सुरूवात केली. त्यानंतर सामन्यात एकाही षटकाचा खेळ झाला नाही. मलेशियाच्या डावाची पाच षटके पूर्ण झाल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 30 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारताकडून मेघनाने सर्वाधिक 69 धावांची तर शेफाली वर्माने 46 तर रिचा घोषने नाबाद 33 धावांची खेळी करत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले होते.

Women's Asia Cup 2022 India Women's Cricket Team Defeat Malaysia Women Team DLS method
PAK vs ENG : लाहोरने निराश केलं असं इंग्लंडचा कर्णधार मोईन अली का म्हणाला?
Women's Asia Cup 2022 India Women's Cricket Team Defeat Malaysia Women Team DLS method
PAK vs ENG : लाहोरने निराश केलं असं इंग्लंडचा कर्णधार मोईन अली का म्हणाला?

भारताने ठेवलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मलेशियाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात विनिफ्रेड भोपळाही न फोडता दिप्ती शर्माची शिकार झाली. त्यानंतर वान जुलियाला राजेश्वरी गायकवाडने 1 धावेवर बाद करत मलेशियाची अवस्था 2 बाद 6 धावा अशी केली होती.

मात्र त्यानंतर मास एलिसाने 17 चेंडूत नाबाद 14 धावा करत मलेशियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला त्यावेळी मलेशियाच्या 5.2 षटकात 2 बाद 16 धावा झाल्या होत्या. पावसाने बराचकाळ उसंत न दिल्याने अखेर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे लावण्यात आला. त्यात भारताने 30 धावांनी सामना जिंकला.

Women's Asia Cup 2022 India Women's Cricket Team Defeat Malaysia Women Team DLS method
Prithvi Shaw : संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वीने सोडले मौन, या गोष्टीमुळे...

आशिया कप महिला क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना मलेशियाशी झाला. नाणफेक जिंकून मलेशियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतीय सलामीवीर मेघना आणि शेफाली वर्मा यांनी फोल ठरवला. या दोघींनी 116 धावांची दमदार सलामी दिली. या सलामीच्या जोरावर भारताने 20 षटकात 4 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली.

स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या साभिनेनी मेघनाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने आक्रमक वृत्तीची शेफाली वर्माने तिला साध देण्याची भुमिका स्विकारली. मेघनाने 53 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. तिने शेफाली वर्मासोबत 116 धावांची सलामी दिली. दुसऱ्या बाजूने शेफाली वर्माने देखील 39 चेंडूत 46 धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली.

मेघना 116 धावा झाल्या असताना बाद झाली. त्यानंतर शेफालीने भारताला 150 च्या पार पोहचवले. शेफाली 19 व्या षटकात बाद झाली. दरम्यान, रिचा घोषने 19 चेंडूत आक्रमक 33 धावांची खेळी करत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले. हेमलताने 4 चेंडूत 10 धावांची छोटेखानी खेळी करत हातभार लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com