सगळ्याच मुलींना एक सवय लागलीय. कोणताही प्रसंग असो, एखादा कार्यक्रम वा प्रवास त्यांचे केस नेहमी वर टांगलेले असतात. थोडक्यात सतत डोक्यावर आंबाड्याचं ओझं असतच. काहींना मोकळे केस आवडत नाहीत म्हणून तर काहींना केसांची अडचण होते म्हणून ते वर बांधलेले असतात.
पण सतत केस बांधून ठेवणं केसांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं की वाईट. हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? नाही ना. तर मग एकदा विचार करून बघा की केस बांधल्याने मोकळं आरामदायक वाटत असलं तरी ते केसांसाठी हानिकारक ठरू शकते.
आंबाडा सुरूवातीला चांगला वाटत असला तरी एका विशिष्ट काळानंतर त्याची सवय होऊन जाते. पण ही सवय महिलांच्या केसांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरते. कशी ते पाहू.
केस सतत बांधून ठेवल्याने केसांची वाढ खुंटते. होय, ज्यांना त्यांचे केस लांबसडक व्हावेत असं वाटतं त्यांच्यासाठी केस बांधणे हानिकारक ठरू शकतं. कारण, केस सतत बांधून ठेवल्याने केस वाढणे बंद होते.
सतत केस बांधल्याने केस सतत ताणले जातात. त्यामुळे केस ताणून कमकुवत होतात. कमकुवत केस तुटतात आणि विरळ होऊ लागतात आणि केस दाट होत नाहीत.
अंबाडा नेहमी बांधून ठेवल्याने डोक्यावर एकाच ठिकाणी दाब पडतो. ज्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. काळजी न घेतल्यास त्याचे रूपांतर मायग्रेनमध्येही होऊ शकते.
अंबाडा सतत खेचून आणि बांधून ठेवल्याने केसांची मुळे समोरून मागे सरकतात. कपाळ मोठे दिसायला लागते. तसेच केस गळल्यामुळे केस पातळ होतात, ज्यामुळे चेहराही मोठा दिसायला लागतो. (Hair Care Tips)
आंबाडा घालून महिला स्वयंपाकघरातील काम, धावपळ,प्रवास इत्यादी अनेक प्रकारची कामे सहज करू शकतात. पण या आंबाड्यासोबतच संसर्ग आणि कोंडा येऊ शकतो. कारण आंबाड्यामुळे बराच वेळ काम केल्याने घाम आणि धूळ आंबाड्यात सहज बसते. ज्यामुळे स्वच्छतेवर परिणाम होतो आणि संसर्ग होण्याची भीती असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.