Ram Navami 2024: प्रभू श्रीरामांनी बांधलेला रामसेतू कसा बुडाला?

रामसेतूसाठी धनुषकोडीची निवड का करण्यात आली?
Ram Navami 2024:
Ram Navami 2024:esakal

Ram Navami 2024: प्रभू श्री रामचंद्रांनी १४ वर्ष वनवास भोगला. वनवासात असताना लंकाधिपती रावणाने सीता मातेला पळवून नेले. त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रभू श्रीरामांनी भारताला श्रीलंकेशी जोडणारा रामसेतू बांधला. ही गोष्ट तर घराघरात प्रसिद्ध आहे. पौराणिक ग्रंथाच्या आधारावर रामसेतूसंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

रामेश्वर येथे गेल्यावर रामसेतूची जागा पहायाला मिळते. येथील नाविक धनुषकोडीहून पर्यटकांना रामसेतूचे अवशेष दाखवयाला नेतात. या ठिकाणी समुद्राची खोली अत्यंत कमी असून, काही ठिकाणी तळ दिसतो.

रामसेतू बांधण्यासाठी नल आणि नील यांना माकड आर्मीने मदत केली होती. पाण्यात तरंगणाऱ्या दगडांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला आहे. हे दगड दुसऱ्या ठिकाणाहून आणले होते. ज्वालामुखीचा 'प्युमिस स्टोन' हा दगड बुडत नसल्याने वापरण्यात आल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

मग असे काय झाले की रामसेतू पाण्यात बुडाला. आजही तेथून आणलेले दगड देशात अनेक ठिकाणी पाण्यात तरंगताना दिसतात. असाच एक दगड उत्तर प्रदेशातील बरेली येथील अलखनाथ मंदिरात पाण्यात तरंगत आहे. (Ram Navami 2024)

Ram Navami 2024:
Ayodhya Ram Mandir: ठरलं! 'या' तारखेपर्यंत भाविकांना करता येणार श्रीरामची पुजाअर्चा; मंदिर समितीची घोषणा

लंकेवर हल्ला करण्यासाठी श्रीरामांनी धनुषकोडी ते श्रीलंकेपर्यंत समुद्रावर आपल्या सैन्यासह बांधलेल्या सेतूला 'रामसेतू' असे नाव देण्यात आले. वास्तविक हा पूल माकडांनी नल राजाच्या देखरेखीखाली १५ दिवसांत बांधला होता. त्याचा उल्लेख 'वाल्मिकी रामायण'मध्ये आहे.

रामायणात या पुलाची लांबी 100 योजना आणि रुंदी 10 योजना आहे. गीताप्रेस गोरखपूर येथून प्रसिद्ध झालेल्या श्रीमद वाल्मिकीय रामायण-कथा-सुख-सागरमध्ये वर्णन केले आहे की, श्रीरामांनी या पुलाचे नाव 'नल सेतू' ठेवले आहे. महाभारतातही श्रीरामाच्या नल सेतूचा उल्लेख आहे. (Ayodhya Ram Mandir )

धनुषकोडीची निवड का करण्यात आली?

वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की, तीन दिवस शोध घेतल्यानंतर श्रीरामांना रामेश्वरमच्या समोर समुद्रात एक जागा मिळाली, जिथून श्रीलंकेला सहज जाता येते. त्यांनी नल आणि नील यांच्या मदतीने त्या ठिकाणाहून लंकेपर्यंत पूल बांधण्यास सांगितले.

धनुषकोडी हे भारत आणि श्रीलंकामधील एकमेव ठिकाण आहे, जिथे समुद्राची खोली नदीएवढी आहे. धनुषकोडी हे भारतातील तमिळनाडूच्या पूर्व किनार्‍यावरील रामेश्वरम बेटाच्या दक्षिणेकडील किनार्‍यावरील एक गाव आहे.

धनुषकोडी हे श्रीलंकेतील तलाईमन्नारच्या पश्चिमेला सुमारे १८ मैलांवर आहे. त्याचे नाव धनुषकोडी आहे कारण इथून श्रीलंकेपर्यंत माकड सैन्याने बांधलेल्या पुलाचा आकार धनुष्यासारखा आहे. हे सर्व क्षेत्र मन्नार सागरी क्षेत्रांतर्गत मानले जातात. (Ram Setu)

Ram Navami 2024:
Ramsetu : रामसेतुचा रहस्यमयी इतिहास समजून घ्या ५ मिनिटात

रामसेतूचा उल्लेख कुठे आहे?

पूल बनवताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे अनेक पुरावे वाल्मिक रामायणात आहेत. काही माकडांनी वाऱ्याच्या साहाय्याने मोठमोठे पर्वत समुद्रकिनाऱ्यावर आणले होते. काही माकडांनी शंभर योजन लांब सूत धरले होते, म्हणजेच पुलाच्या बांधकामात या धाग्याचा अनेक प्रकारे वापर होत होता.

कालिदासांनी रचलेल्या 'रघुवंश'च्या 13 व्या वाक्यात आकाशमार्गातून रामाच्या पुनरागमनाचे वर्णन केले आहे. या मंत्रात श्रीरामांनी माता सीतेला रामसेतूबद्दल सांगितल्याचे वर्णन आहे. स्कंद पुराणातील तिसरे, विष्णू पुराणातील चौथे, अग्नि पुराणातील पाचवे ते अकरावे आणि ब्रह्म पुराणातही श्रीरामाच्या सेतूचा उल्लेख आहे.

रामसेतूवर विज्ञान काय सांगते?

1993 मध्ये, यूएस स्पेस एजन्सी NASA ने श्रीलंकेच्या वायव्येकडील धनुषकोडी आणि पंबन दरम्यान समुद्रात 48 किमी रुंद पट्टी म्हणून उदयास येत असलेल्या लँडमासच्या जागतिक उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्या. यानंतर भारतात यावरून राजकीय वाद सुरू झाला. या पुलासारखा भूभाग रामसेतू म्हणून ओळखला जाऊ लागला. नासाने 14 डिसेंबर 1966 रोजी मिथुन-11 मधून रामसेतूची छायाचित्रे काढली होती.

22 वर्षांनंतर, ISS-1A ला तामिळनाडूच्या किनार्‍याजवळील रामेश्वरम आणि जाफना बेटांमध्‍ये समुद्राखाली एक भूभाग सापडला. मग त्याचे फोटो काढले. या छायाचित्रांमुळे अमेरिकन उपग्रहाच्या छायाचित्रांनाही पुष्टी मिळाली.

Ram Navami 2024:
Ramsetu Song Launch: 'जय श्री राम' गाणं सुरू होणार इतक्यात अक्षयनं...', Viral Video ने अभिनेता चर्चेत

अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञांनीही तपास केला

डिसेंबर 1917 मध्ये सायन्स चॅनलवरील अमेरिकन टीव्ही शो 'प्राचीन लँड ब्रिज' मध्ये, अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञांनी वैज्ञानिक तपासणीच्या आधारे सांगितले की श्री रामांनी श्रीलंकेला पूल बांधण्याची हिंदू पौराणिक कथा सत्य असू शकते. भारत आणि श्रीलंका दरम्यानची 50 किलोमीटर लांबीची रेषा खडकांपासून बनलेली आहे. हे खडक 7000 वर्षे जुने आहेत.

ज्या वाळूवर हे खडक विसावतात ती वाळू 4000 वर्षे जुनी आहे. नासाच्या उपग्रहाने काढलेले फोटो आणि इतर पुराव्यांवरून तज्ञ म्हणतात, 'खडक आणि वाळूच्या युगातील या विसंगतीवरून हे स्पष्ट होते की हा पूल मानवांनी बांधला असावा.

संशोधनानुसार १४८० पर्यंत रामसेतू पूर्णपणे समुद्रावर तरंगणारा होता. त्यानंतर चक्रीवादळामुळे तो समुद्रात बुडाला असल्याचे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

Ram Navami 2024:
Ramsetu : प्रभू रामचंद्रांच्या रामसेतूचं गुढ उलगडलं...; नासाने केला आश्चर्यकारक खुलासा!

१००० किलोमीटरचा रामसेतू

धार्मिक ग्रंथांनुसार लंकेत जाण्यासाठी श्रीरामाच्या सैन्याला समुद्रावर १०० योजन (त्या काळातील मोजण्याचे माप) लांब आणि १०  योजन (१ योजन म्हणजे ८ किमी) रुंद पूल बांधावा लागला. नल आणि नीलसह हजारो वानरांच्या सेनेने पहिल्या दिवशी १४ योजन, दुसऱ्या दिवशी २० योजन, तिसऱ्या दिवशी २१ योजन, चौथ्या दिवशी २२ योजन आणि पाचव्या दिवशी २३ योजनवर दगडफेक केली. अशा प्रकारे ५ दिवसात १०० योजनचे काम पूर्ण झाले. आजच्या काळातील मोजणीनुसार रामसेतूची लांबी १००० किमीपेक्षा जास्त होती.

राम सेतू समुद्रात कसा बुडाला?

रामसेतू समुद्राच्या पाण्यात काही फूट खाली बुडाल्याचे दोन पैलू आहेत. यातील एक धार्मिक आणि दुसरा नैसर्गिक आहे. आतापर्यंत जगभरातील संशोधकांनी रामसेतूवर अनेक अभ्यास केले आहेत. १५ व्या शतकापर्यंत या पुलावरून चालत रामेश्वरमहून मन्नार बेटावर पोहोचता येत होते. असे अनेक संशोधनांमध्ये म्हटले आहे. नंतर हा पूल पाण्याखाली गेल्याचे शास्त्रीय कारण सांगितले जाते की वादळामुळे रामसेतूच्या ठिकाणी समुद्र खोल गेला.

त्याच वेळी, 1480 मध्ये चक्रीवादळामुळे हा पूल तुटला. त्यानंतर समुद्राची पातळी वाढल्याने रामसेतू काही फूट पाण्यात बुडाला. धार्मिक कारणास्तव असे सांगितले जाते की विभीषणाने स्वतः श्रीरामांना हा पूल तोडण्याची विनंती केली होती.

Ram Navami 2024:
Nashik Ramsetu : ‘रामसेतू’चे भाग्य कधी उजळणार? पुलाचा ताबा जडीबुटी, किरकोळ विक्रेत्यांकडे

विभीषणाने रामसेतू का तोडला

पद्मपुराणानुसार, युद्धापूर्वी रावणाचा भाऊ विभीषण याने धनुषकोडी नगरात श्रीरामाचा आश्रय घेतला होता. रावणाशी युद्ध संपल्यानंतर श्रीरामांनी विभीषणला लंकेचा राजा बनवले. यानंतर लंकेचा राजा विभीषणाने श्रीरामांना सांगितले की भारताचा शूर राजा श्रीलंकेवर हल्ला करण्यासाठी रामसेतूचा वापर करेल.

यामुळे श्रीलंकेचे स्वातंत्र्य गमावू शकते. त्यांनी श्रीरामांना पूल तोडण्याची विनंती केली. यावर श्रीरामांनी बाण सोडला आणि पूल पाण्याच्या पातळीपासून 2-3 फूट खाली बुडाला. आजही या पुलावर कोणी उभे राहिल्यास कंबरडे पाणी होते. या ठिकाणाच्या नावाचा अर्थ 'धनुषकोडी' असा होतो, 'धनुष्याचा शेवट'. वाल्मिकी रामायणात मात्र त्याचा कुठेही उल्लेख नाही. कंबन रामायणात श्रीरामांनी हा पूल तोडल्याचा उल्लेख आहे.

Nasa ने ऱामसेतूवर बनवलेला ते व्हिडिओ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com