Lifestyle : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाईट सवयींवर मात करून चांगल्या सवयी अंगी बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. ज्याने तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी पोहोचण्याचा मार्ग जास्त सुकर होतो. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायला जाल आणि तेच काम संपवण्यासाठी सुद्धा उत्साह शिल्लक राहत नाही.
अतिविचार
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. अनेकदा आपल्या अतिविचारामुळेचं आपण स्वत: वर संकटे ओढावून घेत असतो.
विसंगत झोप
प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळ तर सुरूचं असते. या धावपळीत आपली पुरेशी झोप होत नाही. झोप अपूर्ण असेल तर साहजिकच आपली चिडचिड होते. रात्रीची झोपही 8 तास पुर्णचं झाली पाहिजे. जर आपली झोप पुर्ण असले तर त्याचा परिणाम आपल्या कामात पण दिसून येतो. विसंगत झोप ही आजाराला निमंत्रण देणारी असते.
नकारात्मक विचार घेऊन फिरणे
जर आपण नकारात्मक असू तर आपल्या जवळ नकारात्मक उर्जा (Negative Vibes) पाहायला मिळते. त्यामुळे आपण अशा नकारत्मक विचारांना महत्त्व कमी दिल्यास किंवा त्याच्यापासून लांब राहिल्यास याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल.
चीड / नाराजी धरून ठेवणे
बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाही तर आपल्याला राग येतो आणि आपली चिडचिड होते. जर राग तुम्ही मनात धरुन ठेवला तर कदाचित तुमची कामे होणार नाहीत. आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून नेहमीच तक्रार ऐकायला मिळेल.
चुकीच्या आहाराच्या सवयी आणि पुरेसे पाणी न पिणे
आपल्या आहारावर सगळ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपला आहार संतुलित असला पाहिजे. 3-4 लीटर पाणी दिवसाला पिणे गरजेचे आहे. आपण पाणी कमी पित असल्यास त्याचा देखील फरक आपल्या वर जाणवतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.