देगलूर, (जि. नांदेड) : काँग्रेसने कधीकाळी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. पण देशातील गरीब माणूस वरचेवर गरीब होत गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकरी, कामगार, गरीब, पीडित माणसांचे जीवनमान उंचावण्याचे धोरण राबवीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ रविवारी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदार अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अजित गोपछडे, सुभाष साबणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘‘खेड्यातील जनता मजबुरीमुळे शहराकडे वळत आहे. त्यासाठी आमच्या सरकारने गावे समृद्ध व संपन्न करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. शेतीत तीच तीच पिके घेण्याने शेतकरी समृद्ध होणार नाही. त्यामुळे बाजारात जे विकेल आणि टिकेल असे लोकोपयोगी साहित्य निर्माण करावे लागेल. कृषी मालावर आधारित उद्योग उभारण्याचे प्रयत्न केंद्र करीत आहे. त्यातून आगामी काळात शेतकऱ्यांचे समृद्धीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. मोदी सरकारच्या काळात शेतकरी केवळ अन्नदाताच नव्हे तर आता ऊर्जादाता बनत आहे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.