Satara Lok Sabha : 'दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो'; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रतिउत्तर

बालेकिल्ला कोणाचा आहे, कोणाचा नाही याला मी महत्त्व देत नाही.
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Summary

‘‘दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो. लोकांच्या हृदयातून पक्ष वाढत असतो. त्यानुसार आजही सातारा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे.’’

सातारा : बालेकिल्ला कोणाचा आहे, कोणाचा नाही याला मी महत्त्व देत नाही. लोकांच्या मनात यावेळेस भाजप सरकारच्या विरोधात भावना असून, ती या निवडणुकीत दिसून येईल. बालेकिल्ला होण्यासाठी भाजपला (BJP) दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची गरज का लागते. दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो. लोकांच्या हृदयातून पक्ष वाढत असतो. त्यानुसार आजही सातारा राष्ट्रवादीचाच (NCP) बालेकिल्ला आहे, असे प्रतिउत्तर आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या कालच्या शक्तिप्रदर्शनानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendraraje Bhosale) टीका करताना सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही. भाजपची ताकद वाढली आहे, अशी टीका केली होती. त्याला आमदार शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले.

Shashikant Shinde
Hatkanangle Lok Sabha : आमदार प्रकाश आवाडेंचाही 'हातकणंगले'तून शड्डू; 'या' पक्षाकडून उमेदवारी घोषित, महायुतीचं वाढलं टेन्शन

आमदार शिंदे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्यांच्या विचारांची परंपरा जतन करणे हे माझे कर्तव्य आहे. देशात व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या हुकूमशाहीच्या विरोधात लढताना मतदारराजा माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील. जिल्ह्याचा विकासासाठी प्रयत्न करणे व सामान्य लोकांना चांगल्या प्रकारचे प्रतिनिधित्व देणे हे माझे कर्तव्य आहे. कोणाचे आव्हान म्हणून पाहणार नाही. लोकांत भाजपविषयी नाराजी असून, त्यातूनच सातारा लोकसभा मतदारसंघात उठाव होईल. यातूनच शंभर टक्के जनता इतिहास घडवेल.’’

Shashikant Shinde
Kolhapur Lok Sabha : अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी अर्ज भरताना फेरविचार करावा; असं का म्हणाले मुश्रीफ?

आमदार शिंदे म्हणाले, ‘‘कोणचा बालेकिल्ला आहे कोणाचा नाही. याला मी फारसे महत्त्व देत नाही. लोकांच्या मनामध्ये यावेळेस वेगळी भावना आहे. ती या निवडणुकीत सरकारच्या विरोधात दिसून येईल.’’ बालेकिल्ला होण्यासाठी भाजपला दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची गरज का लागते, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ‘‘दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो. लोकांच्या हृदयातून पक्ष वाढत असतो. त्यानुसार आजही सातारा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com