कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Covid19) पार्श्वभूमिवर राज्यांची तयारी असावी, यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना निधी दिलेला आहे. यामध्ये जवळपास 11,00 कोटी रुपये राज्याला देण्यात आले आहेत. हा निधी अद्यापर्यंत वापरण्यात आला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारवर याबद्दल काय बाजू मांडतं हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी सांगितलं की, देशावर सध्या तिसऱ्या लाटेचं संकट आहे. ही लाट येऊ नये यासाठी प्रयत्न सूरू आहेत. मात्र लाट आल्यास राज्यांकडे औषधी, ऑक्सिजन असावा यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना निधी मंजूर केला होता. या निधी राज्यांना मिळाला देखील, मात्र राज्यातील सरकारने हा निधी वापरलाच नसून, हा निधी अद्यापही पडून असल्याची धक्कादायक माहिती भारती पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona new patients) मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे दिसते. आज राज्यात 52 रुग्णांचा (corona deaths) मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,42,023 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 27,नाशिक 7,पुणे 6,कोल्हापूर 2,लातूर 3,अकोला 5,नागपूर 2 मृत्यू नोंदवले गेले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.