Accidents in Maharashtra: वाहने जपून चालवा! ११ महिन्यांत १३५७९ जणांचा अपघाती मृत्यू; सोलापूर, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद

यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये ३०० पेक्षा अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ११ महिन्यात एकूण ३१ हजार अपघातात तब्बल १३ हजार ५७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.
Road accident in Maharashtra
Road accident in MaharashtraEsakal

सोलापूर : रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बेदरकारपणे व सलग वाहन चालविणे, रस्त्यातच थांबलेली बेशिस्त वाहने आणि मागून धडक होऊन अपघात व मृत्यू वाढल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये ३०० पेक्षा अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ११ महिन्यात एकूण ३१ हजार अपघातात तब्बल १३ हजार ५७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.

हजारो कोटींचा खर्च करून रस्त्यांची कनेक्टिव्हीटी वाढली आणि दुसरीकडे अनेक वाहनांचा वेग बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त झाला. चारचाकीस्वार सिटबेल्टचा तर दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. दुसरीकडे रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना करण्यावर नुसतीच चर्चा होते, उपाययोजना केवळ कागदावरच राहतात अशी वस्तुस्थिती आहे. महामार्गांवर बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करणारी वाहने व अवजड वाहने थांबलेली असतात. अंधारात मागून येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही आणि अपघात होऊन एकाचवेळी तीन ते पाच जणांचा मृत्यू होत असल्याच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

शिकाऊ परवाना आता ऑनलाइन झाल्याने बहुतेक तरूणांकडे किमान दुचाकी आहेच असे चित्र आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी १८ वर्षांचा झालेला नसतानाही त्याच्या हाती वाहन दिसत आहे. संबंधित यंत्रणेकडून चिरीमिरी घेऊन अशांवर कारवाई टाळली जाते, असेही बोलले जाते.

‘या’ जिल्ह्यात ३००हून अधिक मृत्यूची नोंद

अमरावती (३३१), बुलढाणा (३७५), यवतमाळ (३८५), छत्रपती संभाजीनगर (४३५), बीड (४१५), जालना (३०५), नांदेड (३४०), लातूर (३३९), कोल्हापूर (३७६), पुणे (१२७९), सोलापूर (७९८), सातारा (४५१), सांगली (३१९), चंद्रपूर (३१५), नागपूर (६४४), धुळे (३०९), जळगाव (४३२), नाशिक (१००२), नगर (७७९), मुंबई (५४१).

मागील तीन वर्षांतील अपघात व मृत्यू

  • २०२१ (जानेवारी ते नोव्हेंबर)

  • एकूण अपघात

  • २६,५३५

  • अपघाती मृत्यू

  • १२,१७०

  • गंभीर जखमी

  • २०,७३४

  • ----------------------------------------------------

  • २०२२ (जानेवारी ते नोव्हेंबर)

  • एकूण अपघात

  • ३०,३९०

  • अपघाती मृत्यू

  • १३,८६८

  • गंभीर जखमी

  • २४,७४०

  • -----------------------------------------------------

  • २०२३ (जानेवारी ते नोव्हेंबर)

  • एकूण अपघात

  • ३०,८५७

  • अपघाती मृत्यू

  • १३,५७९

  • गंभीर जखमी

  • २६,०५२

यावर्षी अपघाती मृत्यू वाढलेले जिल्हे

अकोला (२८), बुलढाणा (२२), परभणी (१९), लातूर (१५), हिंगोली (११), पुणे (२४), गडचिरोली (६), नंदुरबार (१८) व सोलापूर जिल्ह्यात आठ अपघाती मृत्यू अवघ्या ११ महिन्यात वाढले आहेत. १ ते २७ डिसेंबरपर्यंत देखील रस्ते अपघातात राज्यातील पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दंडाची रक्कम वाढलेली असताना, रस्ते चकाचक झालेले असतानाही अपघात व अपघाती मृत्यू वाढण्याची नेमकी कारणे काय आणि त्यावर ठोस उपाययोजना काय कराव्यात याचा गांभीर्याने विचार करणे काळाची गरज बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com