मुंबई : गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात 23 वाघांचा मृत्यू (Tiger In Maharashtra) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत या सर्व 23 वाघांचा (Tiger) मृत्यू झाला आहे. वाघांमुळे माणसांच्या मृत्यूच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात वाघांनी माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या यात वाघांच्या हल्ल्यात 39 जणांनी प्राण गमावले आहेत. (23 Tigers Died In Last Six Month In Maharashtra)
दरम्यान सहा महिन्यात मृत्युमुखी पडलेल्या 23 वाघांपैकी 15 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल आहे. तर, चार वाघ विषाच्या वापरामुळे दगावले आहेत.. याशिवाय दोन वाघांचा मृत्यू हा शिकारीत झाला असून, एक वाघ रेल्वे अपघातात तर, एक वाघ विजेचा धक्का लागून मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या 23 वाघांपैकी 15 वाघ हे प्रौढ होते, तर अन्य आठ वाघ शावक होते.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असूनही 2010 मध्ये भारतातील वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचले होते. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैलम येथे आहे. तर, देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पेंच येथे आहे. दरम्यान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 15 लाखांची मदत दिली जाते, असे राज्य सरकारने लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.