
'हे फडणवीसांकडून अपेक्षित नव्हतं', अजित पवारांचं अर्थसंकल्पावर उत्तर
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra Budget) केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली. त्यालाच आज अजित पवारांनी विधानसभेत उत्तर दिले आहे. राज्याचा गाडा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात चालेल अशी सोय या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा: जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीला पर्याय नाही - अजित पवार
गुजरातचा अर्थसंकल्प सादर करत असतील तरी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही घोषणा मिळून अर्थसंकल्प सादर करतात. टीका करायची म्हणून टीका करू नका. अर्थसंकल्प फसवा असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पण, हे सर्व आरोप खोटे आहेत. अर्थसंकल्पातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कोरोना काळात कर्मचाऱ्यांचं सर्वांनी स्वागत केलं. पण, काही लोक आता कोरोनावरून टीका करत आहेत. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडलाय. कोरोनाला हलक्यात घेऊ नका. चीनमध्ये पुन्हा १५ शहरं बंद आहेत, असं अजित पवार म्हणाले.
'हे फडणवीसांकडून अपेक्षित नव्हतं' -
राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी दिला, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्याला देखील अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडून हे अपेक्षित नव्हतं. एखादं खातं आपल्याकडे असल्यामुळे ते पैसे त्या व्यक्तीचे नसतात. सरकार आणण्यासाठी तुम्ही मुद्दाम प्रयत्न करताय. पण, असं काहीतरी सांगून तुम्ही वस्तूस्थिती बदलू शकत नाही, असं अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरातांना काही कळतंय का? असं शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटेल. पण, अर्थसंकल्पावर शेवटची सही मुख्यमंत्र्यांची असते. आपल्या पक्षाला सर्वाधिक निधी देण्याचा प्रयत्न शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिनपैकी कोणताही पक्ष करत नाही, असं अजित पवार म्हणाले.
Web Title: Ajit Pawar Replied Devendra Fadnavis On Maharashta Budget 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..