Sahitya Sammelan 2023 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे काही नवं नाही. दरवर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे साहित्य संमेलनामध्ये वाद होत असतोच. तो कधी साहित्य संमेलनाध्यक्षांवरुन तर कधी भाषेवरुन...यंदाचे ९६ वे मराठी साहित्य संमेलन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चाही होताना दिसते आहे.
मायबोली मायभाषा मराठीचा गौरव म्हणून ज्या सोहळ्याकडे पाहिले जाते त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून वर्ध्यामध्ये सुरुवात झाली आहे. निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी आहे.
संमेलनाचा आज पहिला दिवस होता. मात्र हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ झाल्याचे दिसून आले.
साहित्य संमेलनाच्या सभामंडपाबाहेर देखील काही महिलांनी गोंधळ घातल्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये त्या महिलांनी आम्हाला बोलू द्या, कुणीतरी आमचं ऐका, हवं तर आम्हाला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जा पण विदर्भ वेगळा करुन द्या.
अशी मागणी त्या महिलांनी केल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी वातावरण आणखी बिघडू नये म्हणून त्या महिलांना सभा मंडपापासून दूर नेले.
दरम्यान या प्रकारानं उपस्थित प्रेक्षकांमध्ये, साहित्यकांममध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु झाला होता. विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर वातावरण काही वेगळेच असल्याचे दिसून आले. या आंदोलकांची दखल मुख्यमंत्री शिंदेंनीही आपल्या भाषणात घेतली.
शिंदे म्हणाले, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.