केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील पाचवं आणि शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही राजकीय वर्तुळातून यावर कौतुक केले जात आहे तर काही नेत्यांकडून टीका देखील केली जात आहे.
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता. यामध्ये काही महत्वाच्या योजना आणि घोषणा करण्यात आल्या. इनकम टॅक्ससाठीची मर्यादा 5 लाखांवरून 7 लाखांवर नेण्यात आली आहे. तरीही आमदार बच्चू कडू यांनी मात्र अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. इंग्रजीमधून बजेट सादर झाल्यामुळे बच्चू कडू नाराज झाले आहेत. राष्ट्रभाषेचा अवमान झाल्याचंही बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत.
हिंदी राष्ट्रभाषा असल्याने देशाचं बजेट हिंदीमधून सादर व्हायला पाहिजे होतं. भाजप ही संस्कृती जोपासणारा पक्ष असल्याने पुढच्या अर्थसंकल्पीय बजेट हिंदीतून सादर व्हावं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीणार असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, तुम्हाला हिंदी बोलता येत नसेल, तर दुसऱ्याकडून ते बजेट मांडा. नाहीतर आधी माफी मागून इंग्रजी बोला, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच या अर्थसंकल्पावर आपण समाधानी आहोत, पण सरकारने गरिबीची व्याख्या निश्चित केली नाही. घरकूलमध्ये शहर-ग्रामीण तफावत आहे, त्यामध्ये सुधारणा केलेली नाही. शेतकरी, मजूर यांचा भाग सुटलेला आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.