मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यास १५ दिवसांची मुदतवाढ; मराठा तरूणांना आता ‘एसईबीसी’च्या प्रमाणपत्राऐवजी पोचपावती जोडून करता येणार अर्ज

राज्यात जवळपास १७ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पण, ही मुदत संपण्यापूर्वीच अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी उमेदवारांना अर्ज करण्याच्या मुदतवाढीचे आदेश काढले आहेत. आता मराठा समाजातील ‘एसईबीसी’तील पात्र उमेदवारांसह पोच पावती जोडूनही अर्ज करता येणार आहे.
solapur sakal news
solapur sakal newssakal

सोलापूर : राज्यात जवळपास १७ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पण, ही मुदत संपण्यापूर्वीच अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी उमेदवारांना अर्ज करण्याच्या मुदतवाढीचे आदेश काढले आहेत. आता मराठा समाजातील ‘एसईबीसी’तील पात्र उमेदवारांसह पोच पावती जोडूनही अर्ज करता येणार आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्याचा शासन निर्णय देखील पोलिस भरती प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी निघाला आहे. त्यानुसार या भरतीत एसईबीसी प्रवर्गातील तरूणांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, शासन निर्णयानंतरही मराठा तरूणांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. शासनाच्या संकेतस्थळावर तशी सुविधा अद्याप उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर ‘एसईबीसी’साठी पात्र तरूणांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ३१ मार्चच्या मुदतीपर्यंत काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे एसईबीसीचे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती अर्जासोबत सादर करावी. मात्र, कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे जरूरी आहेत, असेही आदेशात नमूद आहे.

‘सकाळ’चा पाठपुरावा अन्‌ अर्ज करण्यास मुदतवाढ

८ मार्च रोजी ‘सकाळ’ने ‘जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पर्यायच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत करून मराठा तरूणांना दहा टक्के आरक्षण जाहीर झाले, परंतु पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत २५ दिवसच शिल्लक असून जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ३० ते ४५ दिवस लागतात, असेही महत्वाचे मुद्दे त्यात मांडले होते. त्यानंतर २३ मार्च रोजी ‘मराठा आरक्षणानंतरही ‘एसईबीसी’ची प्रतीक्षाच’ असे वृत्त प्रकाशीत करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत अर्ज करण्यास १५ दिवसांची मुदतवाढ आणि अर्जासोबत प्रमाणपत्राऐवजी पोच पावती जोडण्याची मुभा ‘एसईबीसी’तील तरूणांना देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com