NCP : निवडणुका आल्या की, मी कायम सावध असतो; असं का म्हणाले राष्ट्रवादीचे आमदार?

'कोणतीही निवडणूक असली की मी कायम सावध असतो.'
MLA Balasaheb Patil
MLA Balasaheb Patilesakal
Summary

'कोणतीही निवडणूक असली की मी कायम सावध असतो.'

कऱ्हाड (सातारा) : कोणतीही निवडणूक आली की, मी कायम सावध असतो. मला लगेच कळतं काय होत ते. त्यामुळं मी सावध आहे, असं सूचक वक्तव्य माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील (MLA Balasaheb Patil) यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या (Market Committee Election) पार्श्वभूमीवर केलं. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणं ज्या याद्या होणार आहेत, त्या जुन्या यादीप्रमाणंच मतदान होईल, असेही संकेत त्यांनी यावेळी दिले.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तुमची तयार कशी सुरु आहे? या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, कोणतीही निवडणूक असली की मी कायम सावध असतो. आता लम्पी आला आहे, मी लगेच बैठक घेवून सूचना केल्या. मला लगेच कळतं काय होतं ते. त्यामुळं निवडणुक लागेल त्यावेळी आपण बघू. मी सावध आहे. बाजार समितीच्या निवडणुकांबात ते म्हणाले, सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणूक घ्याव्या, असा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. सध्या सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. निवडणूक प्राधिकरणानं जुन्याप्रमाणं आम्ही याद्या गोळा करत आहोत, असं जाहीर करुन आम्ही तयारी करत आहोत असंही जाहीर केलं.

MLA Balasaheb Patil
Shiv Sena : ..तर कोल्हापूरच काय, देश सोडून जातो; शिवसेना नेत्याचं राजेश क्षीरसागरांना ओपन चॅलेंज

'..तर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळू शकतो'

गेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा जुना भाजपचा (BJP) निर्णय पुन्हा मांडून त्याचा कायदा केला. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झालेली दिसत नाही. मात्र, शेतकऱ्यांतून मतदान होवून बाजार समितींना निवडणुका परवडणार नाहीत. शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतकऱ्यांचं दोन ठिकाणी शेती आहे. त्यांना मदतानाचा अधिकार कोठे द्यायचा? हा प्रश्न मोठा आहे. त्यामुळं उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार आता जी यादी होणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, हमाल, मापाडी यांच्यातूनच निवडणूक होईल. मात्र, शासनानं जर मनात आणलं तर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळू शकतो.

MLA Balasaheb Patil
Narendra Modi : PM मोदींना वाढदिवसानिमित्त तुम्हीही 'शुभेच्छा' पाठवू शकता; फक्त 'हे' काम करावं लागेल

पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू दुर्दैवी

कऱ्हाडला भुयारी गटर झाल्यापासून पहिल्यांदाच त्यात पडून एका पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यात अन्य एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. अशी घटना शहरात प्रथमच शहरात घडली आहे. ही घटना दुर्दैवी आहे. कर्मचाऱ्यांनी काम करत असताना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. योग्य त्या सुविधाही त्यांना पुरवल्या पाहिजे, असंही आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com