मुंबई : आमच्या हातात ईडी-सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला आहे. फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. (BJP wont be left when ED CBI comes into our hands sanjay raut warning to devendra fadnavis)
राऊत म्हणाले, "ज्या दिवशी आमच्या हातामध्ये केंद्रात ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं, त्यावेळी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नसेल. लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहितीए. त्यांनाच माहितीए असं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा" (Latest Marathi News)
फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "हे बिनपरिवाराचे आहेत का? यांना पोरंबाळं झाली नाहीत का? का दुसऱ्यांची पळवली आहेत. भाजप हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाहीत त्यामुळं ते आमची पोरं फोडून घेऊन बसले आहेत. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या पोरांचे पाळणे हालवायला पाहिजेत, दुसऱ्यांच्या पोरांचे नाही, नाहीतर ते पुन्हा पळून जातील" (Marathi Tajya Batmya)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.