औरंगाबादचं नवं नाव छत्रपती संभाजीनगर; CM शिंदेंची मोठी घोषणा

उस्मानाबादचं नाव धाराशीव तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्यात आलं आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra FadnavisSakal Digital

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मागच्या सरकारचे काही निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Cm Eknath Shinde DCM Devendra Fadnavis Cabinet Meeting)

मागच्या सरकारने घाईगडबडीत, अल्पमतात असताना काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव असं करण्यात आलं आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis
दिल्लीतून नामांतर करून आणा, अन्यथा रस्त्यावर उतरू - चंद्रकांत खैरे

याशिवाय मुंबई आणि उपनगर भागामध्ये MMRDA त्या विविध प्रकल्पांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींसाठी शासनाने हमी देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com