"लोकल प्रवास सहजपणे करता येऊ नये अशी व्यवस्था करण्यात आलीय"

"मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अजूनच अवघड करून ठेवला" दोन डोस घेतलेल्या लोकलप्रवासास परवानगी असली तरी एक अट ठेवण्यात आली आहे CM Uddhav Thackeray has complicated the Mumbai Local Train Issue says BJP Keshav Upadhye vjb 91
Mumbai-Local
Mumbai-Local

मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अधिकच अवघड करून ठेवलाय!

मुंबई: जनतेचा दबाव आणि भारतीय जनता पार्टीचे आंदोलन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांनी नियम आणि अटींचा गुंता करून सोपा प्रश्न अवघड करून ठेवला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. त्यांनी ठेवलेल्या अटीशर्तींमुळे प्रत्यक्षात सामान्यांना सहजपणे लोकल प्रवास करता येणार नाही अशी व्यवस्थाच त्यांनी करून ठेवली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Mumbai-Local
ED अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला समन्स बजावण्याच्या तयारीत
CM-Uddhav-Thackeray
CM-Uddhav-Thackeray

केशव उपाध्ये म्हणाले, "सामान्य मुंबईकराला दररोज कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी आणि परतण्यासाठी प्रचंड पैसे आणि वेळ खर्च करावे लागत असल्याने त्यांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी अशी मागणी सातत्याने होत होती. भारतीय जनता पार्टीने त्यासाठी आंदोलनही केले. प्रचंड दबाव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंधरा ऑगस्टपासून प्रवासाची परवानगी दिली. पण ती देतानाही त्यांनी सामान्यांना सहजपणे प्रवास करता येणार नाही आणि सगळ्या गोंधळाचे खापर रेल्वे विभागावर फुटेल अशी व्यवस्था करून ठेवली आहे. रेल्वेकडून लोकलसेवा आधीपासून चालू आहे आणि कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्व अधिकार आणि जबाबदारी राज्य सरकारची आहे अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी सामान्यांच्या परवानगीसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा होता. त्यांनी अहंकारापोटी सामान्य मुंबईकरांशी असा खेळ करायला नको होता."

Mumbai-Local
तुम्ही मंत्रालयात येण्यासाठी याचिका करु की, आंदोलन? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

"सामान्यांनी लोकल रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर राज्य सरकारच्या ॲपवर नोंदणी करायला हवी, अशी अट मुख्यमंत्र्यांनी घातली आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपवर बहुतेक मुंबईकरांनी नोंदणी केली आहे व त्यावर लसीकरण झाले की नाही याची स्पष्ट नोंद आहे. ही तयार सुविधा वापरून सामान्यांची सोय करायच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ॲप वापरा नाही तर महापालिकेकडून पास घ्या असे कोडे घातले आहे. सोपा प्रश्न अवघड करण्याचा हा प्रकार आहे", अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

Keshav Upadhye
Keshav Upadhyesakal media
Mumbai-Local
मुंबईत NCB ची कारवाई, १ कोटीचं ड्रग्ज केलं जप्त

"दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देताना प्रवाशांची लशीबाबत तपासणी करण्याची यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी व अधिकार राज्य सरकारकडे आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी सामान्यांच्या लोकल प्रवासात लशीच्या दोन डोसच्या अटीची पूर्तता कशी होणार याची व्यवस्था निश्चित केलेली नाही तसेच या बाबत रेल्वेशी विचारविनिमय केला नाही. यामुळे गोंधळ उडून सामान्यांना त्रास होईल आणि हा प्रकार रेल्वे स्थानकावर झाल्यामुळे त्याचे खापर मात्र रेल्वेवर फोडता येईल, असा सारा खेळ आहे. सामान्य मुंबईकरांना सातत्याने लोकल प्रवासाला परवानगी नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी देतानाही अहंकार दाखवून दिला आहे. पण त्यांनी अहंकार बाजूला ठेऊन सामान्य लोकांच्या हिताला महत्त्व द्यावे आणि त्यांचा लोकलप्रवास सहजपणे होईल यासाठी राज्य सरकारची यंत्रणा निर्माण करावी. तसेच रेल्वेशी समन्वय साधावा", असे आवाहन उपाध्ये यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com