काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

इंदापूर - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षांचे असून, त्यामध्ये काँग्रेस पक्षास योग्य सन्मान मिळत नाही, असे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पाडेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूर येथे भाजप नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. आठवले म्हणाले, ‘‘महाआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हिंदुत्व स्वीकारले की शिवसेनेने हिंदुत्व सोडून धर्मनिरपेक्षता स्वीकारली हे लवकरच सर्वांना कळणार आहे. पुढील पंचवीस वर्ष महाआघाडी सत्तेवर राहण्याचा दावा करत असली तरी त्यांच्यामध्ये सर्व अलबेला नाही. त्यामुळे घोडा मैदान लांब नाही. हे सरकार पडले तर आमची सरकार बनवण्याची तयारी आहे.’’ काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यामध्ये राजकारण सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस राजा भाऊ सरवदे, पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com