
मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली आहे. त्याचच प्रत्यय आजही दिसून आला, कारण दिवसभरातील आकडेवारी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली. यामध्ये राज्यात कालच्या तुलनेत रिकव्हरी रेट (recovery rate) अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून ते ९४.७३ टक्के झालं आहे. तसेच दिवसभरात नव्यानं आढळून आलेल्या कोरोन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या मोठी असल्याचं दिसून आलं आहे. (Consolation to the state the rate of recovery from covid-19 increased)
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज (गुरुवार) दिवसभरात १५,२२९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ३०७ जणांचा मृत्यू झाला त्यामुळे मृत्यूचं प्रमाणं १.६८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तसेच दिवसभरात २५,६१७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४,८६,२०६ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९४.७३ टक्के इतका झाला आहे. तर राज्यात सध्या २,०४,९७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.