बळिराजाला मदतीसाठी कटिबद्ध - उपमुख्यमंत्री

Ajit-Pawar
Ajit-Pawar

मुंबई - राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून मदतीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.२) दिली. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना कशी मदत करता येईल याबाबत सभागृहात आणि मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

पिकांच्या ऐन मोसमात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. रविवारी सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटही झाली आहे. त्यामुळे उघड्यावर असलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. तर, आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com