

Maharashtra CM supports PM Modi call on fuel saving during energy crisis
Esakal
What Devendra Fadnavis said on PM Modi fuel and gold appeal आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात उर्जा संकट निर्माण झालंय. या संकटाची झळ भारतालाही बसत आहे. मोठ्या प्रमाणावर भारतातील उद्योगांवर याचा परिणाम होत आहे. उर्जा संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता देशवासियांना इंधन, खाद्यतेल बचतीचं आवाहन केलंय. इंधनाचा कमी वापर करा, खाद्यतेल कमी खा असं पंतप्रधान मोदी म्हणाले. इंधन कमी वापरल्यानं, खाद्यतेल कमी खाल्ल्यानं मोठ्या प्रमाणावर परकिय चलन वाचेल असंही त्यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं हे आवाहन योग्यच असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलीय.