मदत नको, प्रचार आवरा! बळीराजावर आभाळ कोसळलंय, जीवनावश्यक वस्तूंच्या किटवर नेत्यांनी छापले फोटो

Dharashiv Rain : अतिवृष्टीने पीक, जमीन, जनावरं सगळं वाहून गेलं असताना सरकारकडून बळीराजाला मदतीची अपेक्षा आहे. मात्र नेत्यांकडून यातही पोस्टरबाजी केली जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय.
 Farmers Say Stop Publicity and Provide Real Help in Dharashiv

Farmers Say Stop Publicity and Provide Real Help in Dharashiv

Esakal

Updated on

राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसानं धुमाकूळ घातलाय. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. धाराशीव, बीड, लातूर, जालना या जिल्ह्यांना पावसानं झोडपलंय. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. शेती खरडून गेलीय, तर नदीकाठच्या गावांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आहे. फळबागांमध्येही पाणी साचलं असून आता पिक कुजायला लागलं आहे. सरकारकडून बळीराजाला मदतीची अपेक्षा असताना नेत्यांकडून मात्र यातही पोस्टरबाजी केली जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

 Farmers Say Stop Publicity and Provide Real Help in Dharashiv
शेतकऱ्यांसाठी एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस, भुजबळांनी सुरुवात केली, इतर मंत्रीही निर्णय घेणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com