‘शक्तिपीठ महामार्गाला यवतमाळपासून कोल्हापूरपर्यंत प्रचंड विरोध आहे. तरीही कोणत्या कंत्राटदारासाठी हा महामार्ग करण्याचा अट्टहास सरकारचा आहे. राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका,’ अशी कळकळीची विनंती करीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केली.