केंद्र सरकारचा निर्णय धोक्याचा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

Extremely Ill-Advised Maharashtra Home Minister On Allowing Flights
Extremely Ill-Advised Maharashtra Home Minister On Allowing Flights

मुंबई : जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात काहीशी मुभा देत टाळेबंदीचे नियम शिथिल केले. त्यानुसारच देशांतर्गत प्रवासासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील देत, येत्या २५ मे म्हणजे उद्या पासून विमान सेवा सुरु करण्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली असून, हा निर्णय धोक्याचा असल्याचे म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. याचा जबर फटका अर्थव्यवस्थेला बसला असून, पुन्हा अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने टप्याटप्याने अंतर्गत सेवा सुविधा चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशातील प्रवासी विमान सेवा २५ मे पासून सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. यासंबंधीची माहिती केंद्रीय नागरीक हवाई उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्विटर वरून दिली होती. त्यानंतर राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत धोक्याचा असल्याचे म्हटले आहे. आपल्या अधिकृत सोशल माध्यम ट्विटर वर ट्विट करत अनिल देशमुख यांनी रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू केल्याने धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. प्रवाशांच्या स्वॅब शिवाय नुसतं थर्मल स्कॅनिंग चा कोणताही फायदा नसल्याचे म्हणत रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विमान सेवा सुरु करून ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग अथवा प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
----------
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?
---------
हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम
---------  

दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारच्या देशांतर्गत प्रवासासाठी विमान सेवा सुरु करण्याच्या निर्णयानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) महामारीचे गांभीर्य विचारात घेऊन प्रवाशांसाठी नुकतेच नवीन मार्गदर्शक नियम जाहीर केले होते. यामध्ये विमानतळावर दाखल होण्यापूर्वी प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य करण्यात येणार होते. शिवाय प्रवाशांना आरोग्य सेतू ऍप बंधनकारक करण्यात आले असून, प्रवासापूर्वी सामानाचे देखील निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. तर आंतरराष्ट्रीय विमान सेवा जुलैच्या मध्यावर सुरु करण्याचे विचाराधीन असल्याचे हवाई उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com