ठाकरे सरकार केवळ मृतांचे आकडे सांगणारे - आशिष शेलार

ठाकरे सरकार केवळ मृतांचे आकडे सांगणारे - आशिष शेलार

जळगाव : राज्यातील ठाकरे सरकारने माणसे जगविण्यासाठी काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. माणसे जगविणारे नव्हे तर केवळ मृत्यूचे आकडे जाहीर करणारे हे सरकार आहे, अशी टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटलो असलो तरी भाजप मनसेशी युती करणार नाहीच, असे सांगत त्यांनी त्या चर्चेला पूर्णविराम दिला. पक्षसंघटन व दुष्काळी स्थिती आढावा घेण्यासाठी खानदेशच्या दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी आज जळगावात पक्षाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, की राज्य सरकारची जनतेप्रति संवेदनशीलता नाही. कोविड व नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत लोकांना जगविण्यापेक्षा केवळ मृतांचे आकडे जाहीर करण्याचे काम या सरकारने केले. त्यातही लपवाछपवी सुरू आहे. खानदेशचा दौरा आपण केलाय. या संपूर्ण भागात सरासरीइतकाही पाऊस झालेला नसून दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यासंबंधी अहवाल विरोधी पक्षनेते फडणवीस यांना सादर करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.

ठाकरे सरकार केवळ मृतांचे आकडे सांगणारे - आशिष शेलार
Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...
ठाकरे सरकार केवळ मृतांचे आकडे सांगणारे - आशिष शेलार
सोनं गाठणार प्रति तोळा एक लाखांचा टप्पा; कधी ते जाणून घ्या?

...तर अदानींवर कारवाई करा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हस्तांतराचा ठराव राज्य सरकारने करून दिला. अदानी समूहाने नियमबाह्य काही केले असेल तर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईची हिंमत दाखवावी, असे आव्हान शेलार यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com