भाजप नेते गिरीश महाजन यांनी पाच राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना निकाल भाजपच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई - पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणीचे कल आता स्पष्ट होत आहेत. पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला धक्का बसला असून आम आदमी पक्षाला बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पाच राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना निकाल भाजपच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे.
देश भाजपमय होत असून येत्या काही दिवसात महाराष्ट्रातही (Maharashtra) बदल होईल असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. पाच राज्यापैकी चार राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय. पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत.
गिरीश महाजन यांनी त्यांच्याविरोधात खोट्या केसबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सरकारी वकील चव्हाण यांनी समोर यावे. आम्ही व्हिडिओ प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत आहोत. CCTV आहे मग रिकॉर्डिंग कुठून झाली असे कोण कसे बोलू शकेल. दूध का दूध पाणी का पाणी म्हणतात मग करा चौकशी असं आव्हानही राज्य सरकारला त्यांनी दिलं आहे.
राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. यासंदर्भात महाविकास आघाडीनेे राज्यपालांकडे धाव घेतली होती. दरम्यान, यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक चुकीची असून यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.