ग्रामसेवकांची पदे रिक्त! ग्रामसेवकांना गावात नसल्याचा फलक अन्‌ संपर्क क्रमांक लावण्याचे बंधन; ग्रामपंचायतीतून गावकऱ्यांना ७९ सेवा

रिक्त पदांमुळे दोन-तीन गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे ग्रामसेवक कोणत्या दिवशी गावात आहेत किंवा नाहीत, याचा फलक संपर्क क्रमांकासह कार्यालयाबाहेर लावावा, असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गावकऱ्यांची गैरसोय होवू नये हा हेतू आहे.
grampanchayat
grampanchayatsakal

सोलापूर : जिल्ह्यातील एक हजार १९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची ८६ आणि ४५ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे त्यांना दोन-तीन गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे ग्रामसेवक कोणत्या दिवशी गावात आहेत किंवा नाहीत, याचा फलक संपर्क क्रमांकासह कार्यालयाबाहेर लावावा, असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गावकऱ्यांची गैरसोय होवू नये हा त्यामागील हेतू आहे.

गावातील प्रत्येक गावकऱ्यांना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ७९ प्रकारच्या सेवा दिल्या जातात. जागेचा उतारा, जन्म- मृत्यू दाखला, घरकूल, विहिरी अशा विविध योजनांची सुरवात ग्रामपंचायतीतूनच होते. सध्या सेतू सेवा केंद्रे बंद असल्याने ग्रामस्थांना ग्रामपंचायतीतूनच सेवा मिळणे अपेक्षित आहे. परंतु, अनेकदा ग्रामसेवक दुसऱ्या कामासाठी किंवा तालुक्याच्या ठिकाणी बैठकांसाठी गेलेले असतात. अशावेळी गावकऱ्यांना काही काम असल्यास विनाकारण हेलपाटे मारावे लागतात. त्यावर उपाय म्हणून ग्रामसेवकांनी त्या दिवशी गावात आहेत की नाहीत, याची माहिती ग्रामस्थांना देणे अपेक्षित आहे. त्यासाठी कार्यालयाबाहेर ठळक फलक लावावा आणि त्यावर संपर्क क्रमांक लावावा, अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाद्दिन शेळकंदे यांनी दिल्या आहेत. गावातील कोणतेही काम थांबणार नाही, ग्रामस्थांची गैरसोय नको, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या जिल्हा परिषदेत प्रशासकराज असल्याने विकासकामांची सर्व मदार अधिकाऱ्यांवरच आहे.

ग्रामस्थांची होणार नाही याची दक्षता घ्यावी

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या तुलनेत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे एका ग्रामसेवकाकडे दोन गावांचा कार्यभार आहे. अशावेळी गावकऱ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी संबंधित ग्रामसेवकांनी ते कोणत्या दिवशी त्या गावात असतील याचा फलक व त्यावर संपर्क क्रमांक देणे अपेक्षित आहे.

- इशाद्दिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

पाच तालुक्यात सर्वाधिक रिक्त पदे

जिल्ह्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची संख्या ९५१ आहे. पण, सध्या त्यातील १३१ पदे रिक्त आहेत. अक्कलकोट तालुक्यात २०, बार्शी तालुक्यात ३९, करमाळ्यात २१, कुर्डुवाडीत १३ व माळशिरस तालुक्यात दहा पदे रिक्त आहेत. आता नवीन पदभरतीतून ही रिक्त पदे भरली जातील आणि त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी मिळेल, अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com