

Maharashtra Rain Update
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. परिणामी पावसाळी मोसमातही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तसेच पाऊस नसल्यामुळे अनेक पिकं करपत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. उन्हाच्या झळांपासून हैराण झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना हवामान विभागाने सुखावणारी बातमी दिली आहे.