मराठा आरक्षणाच्या सकारात्माक निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्याच्या सामाजिक परिघावर उमटणार असून मराठा आरक्षणाच्या निर्णयाने राज्यातील सुमारे साडेचार कोटी लोकांच्या लढ्याला मूर्त स्वरूप मिळणार आहे.
मुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करून राज्यात सुमारे टक्के असलेल्या मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून टक्के आरक्षण लागू करणारे विधेयक गुरूवारी (ता. ) विधीमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. मराठ्यांना हे आरक्षण SEBC प्रवर्गातून दिले असले तरी सध्याच्या एससी, एसटी व ओबीसी वर्गांच्या टक्के आरक्षणाशिवाय दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून आरक्षण लागू करणारे विधेयक आणि मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल (ATR) सभागृहाच्या पटलावर मांडला. यात मराठा समाज कसा मागासलेला आहे यावर प्रकाश झोत टाकला आहे. त्यातील काही मुद्दे वाचकांसाठी आपण आम्ही येथे देत आहोत.
मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर राज्यातील सुमारे 85 टक्के समाज आरक्षणाच्या कक्षेत येईल असेही मागासवर्ग आयोगाने नमूद केले आहे. याचाच अर्थ दलित, आदिवासी, भटक्या जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गाची एकून लोकसंख्या 55 टक्के असल्याचा निष्कर्ष काढता येतो. आता 30 टक्के मराठ्यांना 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर राज्यातील 85 टक्के जनतेला 68 टक्के आरक्षण दिले जाणार आहे
मराठ्यांची सामाजिक स्थिती
दहा वर्षात ग्रामीण भागातून शहरी भागात होणा-या मराठ्यांच्या स्थलांतरात मोठी वाढ झाली आहे. सुमारे 21 टक्के मराठा कुटुंबांतील सदस्य उपजीविकेच्या शोधात शहरी भागामध्ये स्थलांतरित झाले आहेत. यात माथाडी, हमाल, डबेवाला, घरगडी, गोदी कामगार आदी ठिकाणी अत्यंत हलक्या दर्जाची मोजमजुरीची कामे करत असल्याचे आढळते.
मराठ्यांचा शैक्षणिक दर्जा
मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाबाबत संविधानिक तरतूदी पाहता एकून लोकसंख्येच्या जवळपास 30 टक्के असणा-या मराठा समाजास 'मागास' दर्जानंतर राज्यातील जवळपास 85 टक्के जनता मागास गणली जाणार आहे. तसेच या सर्व जनतेस आरक्षणाचे फायदे द्यावेच लागणार आहेत.
थोडक्यात मराठा आरक्षण:
मराठा समाजाला मागासलेपणाचा दर्जा दिल्यानंतर भारतीय राज्य घटनेच्या कलम 15 (4) आणि कलम 16 (4) प्रमाणे शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक गुरूवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. यामुळे राज्यात पूर्वी 52 टक्के असलेले आरक्षण आता 68 टक्केवर गेले आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, प्रत्येक 100 व्यक्तीमागे केवळ 4.62 टक्के लोकांनाच शासकीय/ निमशासकीय नोक-या उपलब्ध झाल्या आहेत. मागील दशकातील देशभरातील सरकारी नोकरीतील भरतीचे प्रमाण पाहिले तर लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचे प्रमाण 5 टक्केहून कमी आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, तब्बल 95 टक्के नोक-या खासगी क्षेत्रातील आहेत. त्यामुळे आरक्षणाने फार फार तर शैक्षणिक सेवा-सुविधा मिळू शकतात मात्र त्याने सरकारी नोक-या मिळण्याचे प्रमाण फारच अत्यल्प असेल.
सध्या अनुसूचित जाती- जमातींना (SC, ST) 20 टक्के आरक्षण, इतर मागासवर्गीय (OBC) वर्गाला 19 टक्के आरक्षण तर विमुक्त जाती व भटक्या जमातींना (VJ NT) 11 टक्के आरक्षण तर विशेष मागास प्रवर्गाला (SBC) 2 टक्के असे एकून 52 टक्के आरक्षण विविध समुहांना मिळत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्रात 30 टक्केच्या आसपास मराठा समाज असल्याचे म्हटले आहे. तसेच मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर राज्यातील सुमारे 85 टक्के समाज आरक्षणाच्या कक्षेत येईल असेही मागासवर्ग आयोगाने नमूद केले आहे. याचाच अर्थ दलित, आदिवासी, भटक्या जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गाची एकून लोकसंख्या 55 टक्के असल्याचा निष्कर्ष काढता येतो. आता 30 टक्के मराठ्यांना 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर राज्यातील 85 टक्के जनतेला 68 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. तर, उर्वरित 15 टक्के खुल्या वर्गातील लोकांसाठी 32 टक्के इतक्या जागा उपलब्ध असतील.
केवळ 5 टक्के सरकारी नोक-या उर्वरित 95 टक्के नोक-या खासगी क्षेत्रात
आपल्याला किंवा आपल्या समाजाला आरक्षण मिळाल्यास आपल्याला शासकीय अथवा निमशासकीय नोकरी मिळेल असा आशावाद ठेवणे आजच्या भांडवलशाहीच्या जगात व्यावहारिक ठरणारे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, प्रत्येक 100 व्यक्तीमागे केवळ 4.62 टक्के लोकांनाच शासकीय/ निमशासकीय नोक-या उपलब्ध झाल्या आहेत. मागील दशकातील देशभरातील सरकारी नोकरीतील भरतीचे प्रमाण पाहिले तर लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचे प्रमाण 5 टक्केहून कमी आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, तब्बल 95 टक्के नोक-या खासगी क्षेत्रातील आहेत. त्यामुळे आरक्षणाने फार फार तर शैक्षणिक सेवा-सुविधा मिळू शकतात मात्र त्याने सरकारी नोक-या मिळण्याचे प्रमाण फारच अत्यल्प असेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.