मुंबई - प्राचीन भारतीय ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ आणि जागतिक आर्थिक महासत्ता होऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला..वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे आयोजित ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला स्वामी विद्यानंद, राजेश शर्मा (केपी ग्लोबल), सज्जन जिंदाल (जेएसडब्ल्यू ग्रुप) आणि शैलेश त्रिवेदी (आयटी मंत्रा) आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, सिंधू-हिंदू संस्कृती ही केवळ धर्म नसून एक प्रगत जीवनपद्धती आहे, जी दहा हजार वर्षांपासून टिकून आहे. प्राचीन काळातील खगोलशास्त्र आणि भूगोल यांसारख्या विषयातील प्रगती हे भारताच्या नवनिर्मितीचे पुरावे आहेत. सध्या जग पाचव्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असून ‘एआय’ आणि डेटा क्षेत्रात भारताचे नेतृत्व महत्त्वाचे ठरेल..भारताची भूमिका निर्णायक : शर्मादेशाचा खरा विकास हा प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात असून सर्वांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामी विद्यानंद यांनी केले तर जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आगामी काळात निर्णायक भूमिका बजावेल आणि निर्मिती क्षेत्रात देश मोठी आघाडी घेईल, असा विश्वास राजेश शर्मा यांनी व्यक्त केला.सज्जन जिंदाल म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य असून दावोस येथे झालेले तीन लाख कोटींचे करार प्रत्यक्षात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले..‘पीएम’ फडणवीस उल्लेख अन् टाळ्याभाषणादरम्यान सज्जन जिंदाल यांनी चुकून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘पीएम’ (पंतप्रधान) देवेंद्र फडणवीस असा केला. चूक लक्षात येताच ते म्हणाले, ‘‘कदाचित सरस्वती देवीनेच माझ्या तोंडून हे शब्द वदवून घेतले असावेत आणि भविष्यात ते खरे ठरतील.’’ त्यांच्या या विधानानंतर सभागृहात हशा पिकला. टाळ्यांचा कडकडाट झाला..उत्पादन क्षेत्र हाच कणा : जिंदाल‘उत्पादन क्षेत्रातील प्रगतीमुळेच देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकतो. ही गुंतवणूक दीर्घकालीन असून कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा ती मुख्य कणा असते,’ असे प्रतिपादन जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी केले..जिंदाल म्हणाले, ‘देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये (जीडीपी) सेवा क्षेत्राचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाला असून उत्पादन क्षेत्राचा वाटा १७-१८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर घसरला आहे. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेत केवळ ती ते चार टक्के वाटा आहे. महासत्ता होण्यासाठी चीनप्रमाणेच झेप घ्यावी लागेल.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.