Sambhajinagar Violence : शांतता कमिटीच्या बैठकीत घोषणाबाजी; जलील यांचा काढता पाय

Sambhajinagar Violence
Sambhajinagar Violenceesakal

छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी रात्री राडा झाला. दोन गटांमधल्या भांडणात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच दगडफेक देखील करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहनही जाळले. सध्या शहरामध्ये तणापूर्ण शांतता आहे.

दरम्यान, आज शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीला छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती राहणार होती. त्यासाठी ते बैठकस्थळी दाखल झाले, मात्र ते बैठकीसाठी येताच काहींनी 'जय श्रीराम' नावाने घोषणाबाजी केली. त्यामुळे खासदार जलील तेथून निघून गेले.

हेही वाचाः जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

दरम्यान, काल रात्री झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिनसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी १५ गाड्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपासासाठी ८ पथके नियुक्त केले आहेत.

Sambhajinagar Violence
Fact Check : राहुल गांधींनी 2013 मध्ये फाडलेला 'तो' कागद खरंच अध्यादेश होता का? वाचा व्हायरल फोटोमागचं सत्य

सर्वांनी शांतता पाळावी- फडणवीस

संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काही लोकांचा प्रयत्न आहे की भडकवणारे स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहीजे. अशा नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. चुकीचे स्टेटमेंट देऊ नये सर्वांनी शांतता पाळावी. याला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही, असं आवाहन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com