मुंबई : ‘‘आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो मात्र त्यांनी ती निवडणूक जाहीर केली नाही. आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत आहेत यावरुन काय चाललेय हे जनतेला दिसत आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना आमदार राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सत्ता बदलाच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्या सर्व न्यायालयात गेल्या आहेत. सोळा बंडखोर आमदारांचे निलंबन करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना काढलेल्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत वेळ दिली होती. त्याच्याआधी अशी निवडणूक होऊ नये. न्यायालयातील प्रकरणवर खुलासा झाल्यावर निवडणूक व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने पत्र देण्यात आले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. रविवारी (ता.३) अध्यक्षपदाची निवड होत असताना उपाध्यक्षांना पूर्णपणे सभागृहाचे काम करण्याचा अधिकार आहे. किंबहुना त्यांची ती जबाबदारी आहे ती निरपेक्षपणे पार पाडतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.